Monday, February 28, 2011

मराठी साहित्य

केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो

कुसुमाग्रजांचा आज अकरावा स्मृतिदिन. त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतोच. त्यांच्या कवितांबद्दल वेगळं लिहिण्याची गरज नाही, मात्र त्यांचं घरातल्या गडीनोकरांचीही काळजी घेणारं मृत्युपत्र आज अचानक आठवलं. (निव्वळ पाच हजारांत त्यांच्या सगळ्या कवितांचे प्रकाशनहक्क पदरात पाडून घेण्याचा काहींचा धूर्तपणाही त्यातून उघड झाला होता, ही बाब अलाहिदा.) त्यांच्या ’केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो’ ह्या कवितेतल्या आठवणीत रूतून बसलेल्या या काही ओळी. बोरकरांच्या ’टाचा घाशीत प्रकाशाचा घोडा थोडा अडतो आहे’ ची आठवण करून देणार्‍या -

असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे,
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे.

माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही,
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही.

No comments:

Post a Comment